रिलायन्स इंडस्ट्रीज महाराष्ट्रात 3.05 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार,अनेकांना मिळतील नोकऱ्या,जाणून घ्या सर्व माहिती.reliance industries update

Created by shiva 24 January 2025

reliance industries update:-नमस्कार मित्रांनो अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे बिगर कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी आज एक मोठी घोषणा केली आहे, रिलायन्स इंडस्ट्रीज महाराष्ट्रात 3.05 लाख कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक करणार आहे, ज्यामुळे 3 लाखांहून अधिक रोजगार निर्माण होणार आहेत.industries update

रिटेल ते मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रापर्यंत नोकऱ्या

रिलायन्स इंडस्ट्रीजसोबत झालेल्या करारामुळे राज्यातील नवीन ऊर्जा, रिटेल, हॉस्पिटॅलिटी आणि हायटेक उत्पादन क्षेत्रात लाखो नोकऱ्या निर्माण होतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाने दिली. अनंत अंबानी यांच्या नेतृत्वाखाली ही गुंतवणूक पूर्ण होणार आहे.

यावेळी अनंत अंबानी म्हणाले की, “आम्ही या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करत आहोत ही माझ्यासाठी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजसाठी खूप सन्मानाची आणि अभिमानाची गोष्ट आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज नेहमीच आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वासाठी आणि नवीन भारताच्या त्यांच्या संकल्पनेसाठी वचनबद्ध आहे.”भारतातील सर्वात मोठा व्यापारी समूह म्हणून, आम्ही देशभर पसरलो आहोत.retail manufacturing industry 

अनंत यांनी पीएम मोदींचे कौतुक केले

रिलायन्स इंडस्ट्रीजचे नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनंत अंबानी यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘विकसित भारत’ या कल्पनेचे कौतुक केले. तसेच भारताला 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यात महाराष्ट्राच्या भूमिकेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारचे कौतुक केले.reliance industries investment 

Leave a Comment

You cannot copy content of this page